*कोकण Express*
*जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध योजना आणि त्यासाठी निधी जाहीर करून जनतेला फसवण्याचे काम*
*मात्र जनतेच्या आरोग्य सुविधेसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष*
*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध योजना आणि त्यासाठी निधी जाहीर करून जनतेला फसवण्याचे काम करत आहेत. मात्र जनतेच्या आरोग्य सुविधेसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. सामान्य जनतेला आरोग्य सुविधेसाठी आधारवड असणाऱ्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालय, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे लाईट कनेक्शन विजवितरण कंपनीने वीजबिल थकबाकी मुळे खंडित केले आहे. जिल्ह्यात केवळ 3 स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यातील एक गंभीर आजारी तर दुसरे मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. तर तिसरे पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात जनतेला नाईलाजाने जावे लागेल. लाखो रुपयांची बिले भरावी लागतील. सिव्हिल सर्जन पद रिक्त आहे.जनतेच्या आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ रस्ते, पूल सारख्या मलई खाता येणाऱ्या कामांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ कार्यालयातील लँडलाईन बंद आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल नं असलेली पुस्तिका सर्व ग्रा पं ना देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेने आहे.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या मोबाईल नं ची पुस्तिका देण्याचे मान्य केल्याचेही उपरकर म्हणाले.