मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध देवस्थानांनी रद्द केली ई-पासची सक्ती

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध देवस्थानांनी रद्द केली ई-पासची सक्ती

*कोकण  Express*

*मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध देवस्थानांनी रद्द केली ई-पासची सक्ती*

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जवळपास सर्वच निर्बंध आता हळूहळू कमी होत चालले आहेत. त्यातच आता राज्यभरातील प्रसिद्ध देवस्थानांनी देखील ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचे दर्शन घेण्याची मुभा दिली आहे.

कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी तुम्ही जात असाल तर आता थेट मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.

आता यापुढे कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी ई पासची गरज लागणार नसल्यामुळे आता अंबाबाई मंदिराच्या चार दरवाजातून भक्तांना प्रवेश मिळणार आहे.

निर्णयामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच, मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पासची सक्ती रद्द झाल्यानंतर भक्तांनी देखील समाधान व्यक्त केलं.

📣आम्ही करून देतो आपल्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात (व्हाट्सअप प्लॅटफॉर्मवर)🥏अधिक माहितीसाठी संपर्क 9421563257,8767675637

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!