*कोकण Express*
*नरेंद्र मोदींनी भीतीमुक्त भारत निर्माण केला: निलेश राणे*
*देवगड ः प्रतिनिधी*
पंतप्रधान मोदीनी पुढील पंचवीस ते शंभर वर्षाचा विकास कसा होईल याचे नियोजन करून काम सुरू केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींना अठरा मिनिटे बोलता येत नाही, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा तास काम करतात. राम मंदिर होऊ नये हा काँग्रेसचा अजेंडा होता मात्र ते भाजपाचे राज्य आल्यावर राममंदिर झाले.
मोदीनी भीतीमुक्त भारत निर्माण केला, असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
देवगड येथील भाजपचा प्रशिक्षण शिबिरामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी प्रमुख वक्ता म्हणून आपले विचार व्यक्त केले. यावेळी ते बोलत होते काँग्रेसने काश्मीरचा 370 कलम निर्णय इतके वर्षे प्रलंबित ठेवला. याठिकाणी 370 कलम आल्यावर दंगल घडेल तर काश्मीर आपल्या हातातून जाऊ शकतो. अशी भीती दाखवली मात्र भाजप सरकार आल्यावर 370 कलम रद्द झाले. काँग्रेसने ज्या शक्यता व्यक्त केल्या यापैकी काहीही घडले नाही. भारतात दाऊदची अशाच प्रकारे भीती निर्माण करण्यात आली मात्र त्याच्या मालमत्तेचा लिलाव झाला दाऊत काहीही करू शकला नाही. असे सांगून निलेश राणे म्हणाले की सतत भीती दाखवून जनतेला दबावाखाली ठेवायचे हा काँग्रेस अजेंडा होता.
राम मंदिर झाल्यावर दंगल घडेल अशी काँग्रेस अफवा पसरवत होते. मात्र तसे काही घडले नाही अशी कित्येक उदाहरणे ओघवत्या शैलीत देत निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भाजपाने अनेक लाभाच्या योजना राबवल्या आहेत आधार कार्डचा वापर करून सर्व सामान्यांना थेट बँकांद्वारे योजनांचे लाभ देण्यास सुरुवात केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ प्रचार करायचा आहे कारण आपले काम काय आहे हे सांगण्याआधी सर्वसामान्यांना ते माहीत झाले आहे.व त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे.
त्यामुळे सर्व संस्थांवर यापुढे भाजपाचे राज्य आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष म्हणून जयदेव कदम उपस्थित होते. जयदेव कदम यांनीही आपल्या भाषणात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आभार देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी मानले.