“लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…उद्धवा अजब तुझे सरकार”…मनसेची टीका

“लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…उद्धवा अजब तुझे सरकार”…मनसेची टीका

*कोकण Express*

*राज्य सरकारकडून कष्टकरी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा…दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भात पीक नुकसान भरपाई देऊन दिवाळी गोड करण्याची “बाता” फसवी ठरली..!*

*शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी दौरे करणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती दिसली नाही ही खरी शोकांतिका…*

*”लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…उद्धवा अजब तुझे सरकार”…मनसेची टीका*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या माऱ्याने भातपिकाचे नुकसान होऊन मेटाकुटीस आलेल्या बळीराजाची राज्यकर्त्यांनी परत एकदा घोर फसवणूक केली आहे.दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करून “दिवाळी गोड” करू अशी घोषणा करणारे राज्याचे मुख्यमंत्री,मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांची देखील जणू चेष्टाच केली आहे.मदत न मिळाल्याने सणासुदीच्या काळात तुटपुंजी का असेना मदतीच्या आशेवर असणाऱ्या बळीराजाच्या पदरी घोर निराशा आली असून आश्वासनांच्या खैरातींवर समाधान मानून जगण्याची वेळ कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबावर या नादान राज्यकर्त्यांनी आणली आहे असे चित्र आहे.मंत्री घोषणा करतात पण अधिकारी जुमानत नाहीत की शेतकऱ्यांसाठी काही करण्याची इच्छाशक्तीच नाही हे एकदा शेतकऱ्यांच्या भावनांची कदर नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी निदान जाहीर करावं अशी उपरोधिक टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ठाकरे सरकारच्या सुस्त कारभारावर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!