कर्ज माफ करण्यासाठीच राणेंना जिल्‍हा बँकवर सत्ता हवी ; सतीश सावंत

कर्ज माफ करण्यासाठीच राणेंना जिल्‍हा बँकवर सत्ता हवी ; सतीश सावंत

*कोकण Express*

*कर्ज माफ करण्यासाठीच राणेंना जिल्‍हा बँकवर सत्ता हवी ; सतीश सावंत*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

राणेंची जिल्‍हा बँकत ठेव नाही, पण त्‍यांनी कर्ज उचल केले आहे. हे कर्ज माफ करण्यासाठीच त्यांना जिल्‍हा बँकेवर सत्ता हवी असल्‍याचा आरोप जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला. तसेच कणकवली तालुक्‍यात होत असलेल्‍या विजय सावंत यांच्या साखर कारखान्याला माझा विरोध नव्हता असेही ते म्‍हणाले. कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत,संदेश सावंत पटेल,नगरसेवक कन्हैया पारकर,अनुप वारंगआदी उपस्थित होते.
सावंत म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत शांत वातावरणात पार पडेल. प्रशासनाने तशा प्रकारची तयारी केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी मतदारांची भेट घेतली यावेळी सर्व मतदारांनी निर्भीडपणे मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला .कोणत्याही आमिषाला कोणत्याही दहशतीला सहकारी संस्था मतदार बळी पडणार नाही.
ते म्‍हणाले, कणकवली तालुक्‍यात होत असलेल्‍या साखर कारखान्याला विरोध करण्याचे काम राजकीय नेत्‍यांनी केले. पण या जिल्ह्याच्या भवितव्याच्या दृष्टीकोणातून येणाऱ्या ५ वर्षांत साखर व इथेनॉल निर्मितीचा कारखाना कसा पद्धतीने होईल याबाबतचे नियोजन बँकेकडून केले जाईल. माजी आमदार विजय सावंत यांच्या कारखान्याला विरोध करणाऱ्यासोबत आम्ही होतो. परंतु माझा कारखान्याला विरोध नव्हता.यामध्ये कोणीही कारखाना उभारू दे. विजय सावंत वा राणे जरी ते करत असतील तर त्याला जिल्हा बँकेचे सहकार्य करेल. त्यामुळे यामधून जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळेल शेतकऱ्यांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे कारखाना कोण करतोय यापेक्षा कारखाना झाला पाहिजे हे माझे मत आहे.
ते म्‍हणाले, स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह तेरा कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाडी4c घेतली होती. त्या गाड्यांच कर्ज आम्ही स्वतः फेडलं आहे. त्या गाड्या आजही त्यांच्या ताब्यात आहेत. ७ गाड्यांचं प्रत्येकी १८ लाख कर्ज अजूनही थकीत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते अण्णा केसरकर यांचेही १७ लाख थकित आहेत. त्यांचेही पैसे अजून भरले गेले नाहीत. या बोलेरो गाड्यांचे १ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत आणि हे कर्ज बुडविण्यासाठीच त्यांना ही जिल्हा बँक ताब्यात हवी आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राणेंना बँक नकोय, असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे जिल्हा बँक निवडणुक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!