जाणवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रक मध्ये भीषण अपघात

*कोकण Express*

*जाणवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रक मध्ये भीषण अपघात..*

*नऊ कामगार जखमी तर दोघे जण गंभीर..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली रतांबे व्हाळ येथे आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ ते कोल्हापूर या दिशेने जाणारे दोन ट्रक समोरासमोर आल्याने भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त ट्रक मधून जाणारे चालकासह ९ कामगार जखमी झाले आहेत. या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारंवार जाणवली अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोघेजण गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .जखमींमध्ये विनायक कृष्णात चौगुले (३८), शिवाजी पाटील (२८), जयराम बामाजी लांबोरे (४१), चिरंजीव उत्तम पाटील (२६), सुशांत डॉगले (२३), रंगराव कस्तुरे (३८), मिलींद पाटील (२४), सचिन बारड (२७), विवेकानंद चौगुले (२९) व आदींचा समावेश आहे.

या अपघातानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जखमी रुग्णांचा जाबजबाब नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!