*कोकण Express*
*पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी*
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या बैलगाडी शर्यतीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली . यामध्ये बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. निकालानंतर शेतकऱ्यांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली .
आज 3 न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली . यामध्ये न्यायाधीश खानविलकर, न्यायाधीश रविकुमार, न्यायाधीश माहेश्वरी समावेश होता. आजच्या निकालानंतर हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठाकडे जाणार आहे .
मुंबई हायकोर्टाने २०१७ मध्ये बैलागाडा शर्यतीवर बंदी घातली होती . राज्य सरकारने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती . सरकारी पक्षाचा युक्तीवाद बुधवारी पूर्ण झाल्यानंतर आज पेटाच्यावतीने बाजू मांडण्यात आली . वकील मुकुल रोहतगी यांनी राज्यशासनाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला .
निकालानंतर अमोल कोल्हे म्हणाले की , ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्धी लढाई पार झाली आहे . आता भिर्र होणार , फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात असंही कोल्हेंनी सांगितले आहे.
बैलगाडा मालकांनी राज्य सरकारने तयार केलेले नियम पाळा , आपली बैलगाडा शर्यत कायम चालु राहिल असं आवाहन ही अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
एकूणच आता महाराष्ट्रात पुन्हा शर्यतीचा धुराळा उडणार आहे .