*कोकण Express*
*मनसेने राजकारण न करता जबाबदारी म्हणून अमली पदार्थांच्या विरोधात पुढे यावे…*
*सागर नाणोसकर; शिवसेनेची सत्ता आल्यानंतरच अवैध धंद्यावर कारवाई वाढली…*
आज अमली पदार्थ आणि दारुची जी बेकायदेशीर विक्री चालू आहे यात २० च्या आतील तरुण वाम मार्गाला बळी पडताना दिसत आहेत, यामुळे गुन्हेगारी क्षेत्राला चालना मिळायला वेळ लागणार नाही. यासाठी जनजागृती यात्रा सर्व पक्षीयची व्हावी असे शिवसेना तालुकाप्रमुख श्री रूपेश राऊळ यांनी व्यक्त केलेले मात योग्यच असल्याचे म्हणत मनसेच्या पाठिंब्याचे स्वागतच आहे आसा पलटवार युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी मनसेवर केला आहे तर मनसेने टीका वगरे न करताना आपली जबाबदारी समजून वाम मार्गाला जाण्यापासून परावृत्त केल्यास आनंदच आहे याबाबत नाणोसकर यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद केले की शिवसेना हे एक संघटन आहे इथे अत्याचार कधीच खपवून घेतला जात नाही आणि घेतला जाणार नाही हे वेळोवेळी शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. शिवसेना सत्तेवर आल्यानंतरच याविरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस प्रशासनामार्फत कारवाई होताना दिसत आहे जी कधीच आजपर्यंत झाली नव्हती मनसेच्या पाठिंब्याचे स्वागतच आहे. पण मनसेने टिका वगैरे न करता हि आपलीही जबाबदारी आहे हे ओळखून जिल्ह्यातील युवकांना या वाम मार्गाला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले तर आनंद होईल.