*कोकण Express*
*▪️गड किल्ले स्पर्धेत गोवर्धन ग्रुप (पियाळी) प्रथम , तर अक्षरोत्सव स्पर्धेत अभिजीत दशरथ राणे याने बाजी मारली*
*▪️श्रावणी काँम्प्युटर्स व एज्युकेशन संस्थेमार्फत कोरोणा काळात वर्षभर अनेक उपक्रम ,मुलांच्या कलागूणांना वाव*
*कासार्डे ः संजय भोसले*
शिवाजी महाराजानी बांधलेले अथवा जिंकलेले गडकिल्ले हेच आपल्या समोर ऐतिहासिक पुरावे किंवा आपला सांस्कृतिक वारसा म्हणून सध्यातरी उपलब्ध आहे.त्याचे पावित्र राखण्या बरोबरच जनजागृती करणे. तसेच आत्ताच्या पिढीमध्ये एक जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण करने आणि नष्ट होत जाणार्या ऐतिहासिक पाऊलखुणा जतन करून त्याचे गांभिर्य जनमानसात निर्माण व्हावे या उद्देशाने श्रावणी काँम्प्युटर्स अँड एज्युकेशनने गडकिल्ले व अक्षरोत्सव स्पर्धे सारखे उपक्रम राबवले होते त्याचा पारितोषिक व गुणगौरव समारंभ विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय तळेरेच्या सभागृहात पार पडला.
मुलांना संगणकीय प्रशिक्षणा बरोबरच इतरही त्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने संस्थेमार्फत कोरोणा काळात वर्षभर अनेक उपक्रम राबवले गेले आहेत ते असे:*१)रक्षाबंधन* ,या द्वारे समाजातील अतिमहत्वाचे व समाजोपयोगी कार्य करणार्या महान व्यक्तींना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. *२)सलाड डेकोरेशन* — याचा उद्देश अंमली पदार्थाचे सेवन करण्यापेक्षा पाले भाज्या, फळभाज्या,नैसर्गिक फळे यांचे सेवन करून आरोग्य उत्तम ठेवणे.*३)अक्षरोत्सव* अर्थात हस्ताक्षर स्पर्धा — विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे. *४) कृतज्ञता बंध* अर्थात शोध रक्षक दूत *५) गरोदर महीलांसाठी गर्भसंस्कार* —या मध्ये कोरोनामुळे ज्यांना दवाखान्यापर्यंत जाता येत नव्हते किंवा प्रत्यक्ष डाॅक्टरांना भेटता येत नव्हते म्हणून त्यांच्यासाठी विविध तज्ञ डाॅक्टरांचे आॅनलाईन मार्गदर्शन ठेवले होते.
यातीलच एक भाग म्हणून गडकिल्ले स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.त्या स्पर्धकांना आॅनलाईन सर्वकांही दिले होते पण प्रत्यक्ष गुणगौरव कोरोनामुळे होऊ शकला नाही. ते साध्य व्हावे व स्पर्धकांना अधिकची उर्जा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजीत केला होता. सदर दोन्ही स्पर्धेत प्रथम साठी ५००८/— रु व सन्मान पत्र ,द्वितीय साठी ३००८/— रु व सन्मान पत्र,तृतीय साठी २००८/— रु व सन्मान पत्र आणि उत्तेजनार्थ साठी १०००/— रू रोख व सन्मान पत्र दिलेले आहे.
यात यशस्वी झालेले गुणवंत असे—.*अक्षरोत्सव स्पर्धा:*—
प्रथम क्रमांक:अभिजीत दशरथ राणे. द्वितीय क्रमांक:युवराज गुरूप्रसाद आजगावकर , तृतीय क्रमांक: संतोष सहदेव जाधव.
*गड किल्ले स्पर्धा*
प्रथम क्रमांक:गोवर्धन ग्रुप पियाळी (खांदेरी किल्ला)
द्वितीय क्रमांक : विकल्प ग्रुप मालवण (सिंधुदुर्ग किल्ला)
*तृतीय क्रमांक*: मेघस्पर्श ग्रुप नाधवडे (रामगड किल्ला)
*उत्तेजनार्थ*: विभागून
१)जि प पुर्व प्राथमिक शाळा गवाणे (प्रतापगड किल्ला)
२)शिवमुद्रा ग्रुप कट्टा मालवण (रायगड किल्ला)
या व्यतीरीक्त उत्कृष्ट उदयोजकता :—थ्री स्टार ग्रुप मालवण (सिंधुदुर्ग किल्ला),
उत्कृष्ट संकल्पना ;— शिवाजी पार्क लायन्स ग्रुप कांदळगाव (सिंधुदुर्ग किल्ला)
उत्कृष्ट किल्ले बांधनी :— श्रमबिंदू ग्रुप वैभववाडी (विजयदुर्ग किल्ला ) ,
तंबाखु मुक्ती संदेश :—गट क्रमांक २. जि प पुर्व प्राथमिक शाळा गवाणे (तोरणागड किल्ला)
या व्यतीरीक्त कांही ग्रुपना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. १)शिवाजीचा मळा ग्रुप वैभववाडी (राजगड किल्ला) २)एस ए ग्रुप बांदा (मोरेगड किल्ला) ३) महाराजा ग्रुप तळेरे (सिंधुदुर्ग किल्ला) ३) जय भवानी ग्रुप कासार्डे (प्रतापगड) ४)मावळे आम्ही स्वराज्याचे ग्रुप तोंडवली —नांदगाव (रायगड किल्ला) ५) धैर्यशिल प्राईड सहकारी गृहनिर्मान संस्था कुडाळ (विजयदुर्ग किल्ला) ६) जगदंबा ग्रुप शेर्पे (सिंधुदुर्ग किल्ला)
सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकून ३२ स्पर्धकानी सहभाग दर्शवला होता तर हस्ताक्षर स्पर्धेसाठी जिल्ह्यातून १२५पेक्षा जास्त स्पर्धकानी सहभाग दर्शवला होता.
त्याच बरोबर आकाश कंदील आणि पणती रंगभरण प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या आणि परत आपल्या वस्तू घेवून न गेलेल्यांचे आकाश कंदील व पणती ,दिवीजा वृद्धाश्रम असलदे येथे दिले जातील वत्यांची दिवाळी गोड आणि प्रकाशमय केली जाईल असे श्रावणी मदभावे यांनी जाहीर केले.
या सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून गौरवण्यात आले.तर पुढील वर्षी होणार्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ५००९ रु.रोख व सन्मान पत्र , द्वितीय साठी ३००९रू रोखव सन्मान पत्र ,तृतीय साठी २००९रु रोख व सन्मान पत्र आणि उत्तेजनार्थ साठी १००९रू रोख व सन्मान पत्र असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .