इतिहास हा गड, किल्ले यांच्या वरून कळतो

इतिहास हा गड, किल्ले यांच्या वरून कळतो

*कोकण Express*

*▪️इतिहास हा गड, किल्ले यांच्या वरून कळतो*

*▪️आधुनिक जिवनाशी किल्यांची सांगड घालून जिवन समृद्ध बनवा*

*▪️यंदाची दिवाळी फटाक्यांच्या आतशबाजीने ध्वनी व वायुप्रदुषण युक्त साजरी करण्यापेक्षा रस्त्त्यावरच्या गरिबाच्या पणत्या घेवून त्याच्या उजेडाने धर्तीवरच आकाशगंगा आणा*

*कासार्डे  ः  संजय भोसले*

युज अँड थ्रो च्या वापराने घण कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला असून आपल्या शेजारील चीन देश हासर्वात मोठा घण कचरा उत्पादक देश बनला आहे.त्यांच्या मालाला भारतात फार मोठी बाजारपेठ असल्याने ती काबीज करण्यासाठी चिनचे सतत नवनवे प्रयोग चालत आहेत .मात्र सध्या देशात चीनी मालावर बहिष्काराच्या बातम्या येत असल्याने ते मेड इन चायना च्या ऐवजी पी आर सी म्हणजे पिपल्स रिपब्लीक चायना च्या नावाने मार्केटिंग करत आहे. त्यांच्या आकर्षक पॅकेजला भुलून दिवाळीत माल खरेदी करण्यापेक्षा .आपल्या हक्काच्या मानसांकडून वस्तू खरेदी करा.या काळात ते रस्त्याच्या कडेला कुठेही दुकाण मांडून बसलेले दिसतील .*”त्यांचीही दिवाळी गोड होऊ द्या,पणती बनवणार्‍यांच्याही घरात पणती लागू द्या”* अशी भावनिक साद वैभववाडीचे गट विकास अधिकारी *जयप्रकाश परब* यानी दिली.


ते डाॅ. अनील नेरूरकर प्रेरित ,तंबाखु प्रतीबंध अभियान तळेरे,अक्षरोत्सव परिवार,श्रावनी काँम्प्युटर्स ,मेधांश काँम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हास्तरीय गडकिल्ले व हस्ताक्षर स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आणि आकाश कंदील व पणती रंगभरण प्रदर्शन च्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर कासार्डे विकास मंडळाचे स्थानिय कमिटी चेअरमन प्रभाकर कुडतरकर, वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, वामनराव महाडिक विद्यालय तळेरेचे मुख्याध्यापक एस् जी नलगे ,सुनिल तळेकर वाचनालय तळेरे चे नुतन अध्यक्ष विनय पावसकर, माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे,माजी जी प सदस्या सुप्रिया पाताडे,ग्राहक संरक्षण चळवळीचे सदस्य एस एन पाटील,कवी व अभिनेते प्रमोद कोयंडे ,मोटीवेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ, जेष्ठ शिक्षक नंदकुमार गायकवाड,शासकिय रूग्नालय प्राध्यापिका अनिता मदभावे,जि प केंद्रशाळा गवाणे मुख्याध्यापक पवार,पत्रकार उदय दुदवडकर, निकेत पावसकर,संजय भोसले, गुरूप्रसाद सावंत,प्राध्यापक हेमंत महाडिक,श्रावणी काँम्प्युटरचे संचालक व कार्यक्रमाचे आधारस्तंभ मदभावे सर,आदी मान्यवर उपस्थित होते.


जयप्रकाश परब पुढे म्हणाले की मदभावे सर आणि त्यांच्या टिम नी डाॅ .अनील नेरूरकर यांचे प्रेरणेने सुरू केलेले कार्य खरेच कौतुकास्पद असून यात माझाही खारीचा वाटा असावा म्हणून पुढील वर्षिच्या गड—किल्ले स्पर्धेसाठी पहील्या क्रमांकाच्या बक्षीसाची रक्कम माझी असेल अशी ग्वाही ही त्यानी दिली.
तर फटाक्याचे दुष्परीणाम सांगताना ते म्हणाले की फटाक्यात शिश्याचा वाफर करणे घातकच पण आर्थिक फायद्यामुळे डोळेझाक केली जाते.शिवाय त्याच्या धुरामुळे फुफुसावर मोठा आधात होतो हे लक्षात घेतलेच जात नाही.अगोदरच चीन मधून कोरोनाद्वारे जगभर बायालाॅजीकल अॅटॅक झाला असून त्यातून अजून आपण सावरलो नाही .म्हणून यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याची शपथ उपस्थित विद्यार्थी वर्गाकडून घेतली. तर ध्वनी व वायु प्रदुषण विरहीत दिवाळी साजरी करून आणि स्वदेशीचा वापर करून एक नवा आदर्श घालूया.की जेणे करून स्थानिक उद्य्योजक,महीला बचत गट यांचा आर्थिक विकास होईल. *इतिहास हा किल्यांवरून कळतो, आधुनिक जिवनाशी किल्यांची सांगड घालून जिवन समृद्ध बनवा* असे आवाहनही त्यानी केले.


आपल्या प्रास्ताविकात श्रावणी मदभावे यांनी संस्थेमार्फत वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला .प्रणाली मांजरेकर हिने उत्कृष्ट सुत्र संचालन केले तर रिना दुदवडकर यांच्या आभार प्रदर्शनाने आणि अल्पोपआहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!