कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

*कोकण  Express*

*▪️कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहण्यात आली श्रध्दांजली*

*कणकवली  ः  प्रतिनिधी*

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवली तालुका कार्यालय येथे भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहर अध्यक्ष महेश तेली, सांकृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरुणकर, प्रदिप कुमार जाधव, जेष्ठ कार्यकर्ते नादिरशहा पटेल, उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, सांस्कृतिक विभाग कणकवली तालुकाध्यक्ष कमलाकर तांबे, अजु मोर्ये आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपले विचार मांडले. आज देशाला स्वर्गीय इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या कणखर नेतृवाची गरज निर्माण झाली आहे. इंदिरा गांधी या स्वातंत्र्य लढ्यात लहानपणीच वानर सेना निर्माण करुन सहभागी झाल्या. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. खलिस्तान सारखा विषयसुध्दा खंबीरपणे हाताळला. त्यांनी भारत देशाकरीता सर्वोच्च बलिदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थाने खालसा करण्याचा कठोर निर्णय घेतला. आज कॉंग्रेस पक्षाचे विचार जनमानसात पोहोचवून पुन्हा एकदा देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार आणलेच पाहिजे तर आणि तरच भारत देशाला चांगले दिवस येतील. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!