विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी राजेश जाधव यांचे बेमुदत उपोषण

विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी राजेश जाधव यांचे बेमुदत उपोषण

*कोकण Express

*विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी राजेश जाधव यांचे बेमुदत उपोषण*

*कासार्डे ः  संजय भोसले*

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा तळेरे हे एक विकसनशील गाव वसलेले आहे.महामार्गामुळे गावाचे दोन भाग पडले असून बाजारपेठेला फार मोठा फटका सहन करावा लागत आहे.त्यात अरुंद सर्व्हिस रोड,गटारे याचबरोबर अनेक समस्या अपूर्णावस्थेत आहेत.आपल्या गावात महामार्गाच्या लगत वामनराव महाडिक माध्य.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विद्यापिठाचे विजयालक्ष्मी दळवी वरिष्ठ महाविद्यालय व स्वीटलॅंड ही इंग्रजी माध्यमाची शाळा अशी शैक्षणिक संकुले आहेत.या शैक्षणिक संकुलांमध्ये तळेरे पंचक्रोशीतील विविध वयोगटातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सदरच्या शैक्षणिक संकुलांकडे ये – जा करण्यासाठी महामार्गालगत पायी चालत तसेच महामार्ग ओलांडून ये – जा करावी लागते.

सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गाची रुंदी वाढलेली असून त्यावरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावरील व अतिशय वेगवान अशी सुरू झाली आहे. तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यान महामार्गाला दोन्ही बाजूने तीव्र उतार असून यापुर्वी अनेकवेळा येथे वाहन अपघात घडलेले आहेत.नुकतेच अलिकडील काळातील एक उदाहरण म्हणजे. दि.१४ ऑक्टोबर रोजी स्कॉर्पिओ कार महामार्गाच्या एका बाजूने दुभाजक पार करून दुस-या बाजूस विरुध्द दिशेने जात वामनराव महाडिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार धडकून अपघात घडला. तसेच दुसरा अपघात दि.१६ ऑक्टोबर रोजी एक स्विफ्ट कार महामार्गाच्या लगत वामनराव महाडिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारानजिक असलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात घडला.या दोन्ही अपघातात अपघातग्रस्त वाहनांतील व्यक्ती या जखमी होऊन अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.सुदैवानेच या दोन्ही अपघात समयी शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अपघातस्थळी उपस्थित नसल्याने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा अनर्थ टळला.

परंतू अशा परिस्थितीत महामार्गावर अपघात झाल्यास, सदरच्या शैक्षणिक संकुलांकडे पायी ये – जा करणा-या विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यानचे क्षेत्र हे अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे संबंधीत शासन आणि प्रशासनासह सर्वांनीच गांभिर्यपुर्वक लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.तरी देखील महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजाची कार्यवाही सुरु झाल्यापासून आजतागायत संबंधीत शासन आणि प्रशासनाकडून याबाबतीत तळेरे येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांच्या दरम्यान कोणतीही सुरक्षिततेची उपायोजना व त्याबाबतची विशेष तरतूद करण्यात आलेली नाही.ही खेदजनक बाब आहे.आणि या विषयाचे गांभीर्य कोणीच ओळखले नाही.पण याची दखल सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी सुरुवातीपासून घेऊन हा प्रश्न धसास लागेपर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
उपोषण स्थळी पांठींबा देण्यासाठी बाळा जठार, दिलीप तळेकर ,तळेरेचे आजी माजी सरपंच,उपसरपंच,पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच,ग्रामस्थ, व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, वामनराव महाडिक विद्यालयाचे मुख्याध्यापक,चेअरमन,स्विटलँड इंग्रजी मेडीयमचे शिक्षकवृंद व पदाधिकारी,विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी आणि बहुसंख्य ग्रामस्थांची रिघ लागली होती.
तसेच खारेपाटण राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता डी जी कुमावत व उपविभागिय अभियंता ए एस शिवनीवार,यांनी घटना स्थळी भेट देवून सदर उपोषणाची माहीती व प्रस्ताव सर्कल आॅफीस बेलापूर आणि स्थायिक डिव्हीजनला पाठवला असल्याचे सांगितले.मात्र अद्याप एकाही प्रशासकीय अधिकाय्रानी विचारपूस केली नसल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!