*कोकण Express*
*महाविकास आघाडी ठाकरे सरकारच्या दडपशाहीचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने निषेध*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले *
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्राची स्थिती अतिशय बिकट झाली आहे . आज सकाळी भल्या पहाटे पत्रकारीतेत सत्य उघड करून जनतेसमोर आणनारया अर्णव गोस्वामी यांस घरात घुसून अटक करुण नेल्याने राज्यभरात खळबळजनक स्थिती या महाभकास आघाडी सरकार विरोधात झाली आहे .कुणावरही गुन्हे , कुणालाही अटक , कुणालाही घरातुन उचलून डांबून ठेवणे या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे .
राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णव गोस्वामी यांना पोलीसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही क्रुती आणिबाणीतील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे .भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले या दडपशाहीचा निषेध करुन तशा प्रकारचे निवेदन तहसीलदार – वेंगुर्ले यांना दिले . तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार शिंदे साहेब यांनी स्वीकारले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते बाळा सावंत , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , सोशल मिडीयाचे अमेय धुरी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , बुथप्रमुख शेखर काणेकर इत्यादी उपस्थित होते .