सावंतवाडीच्या विकासासाठी पालकमंत्री आणि आमदार केसरकरांनी आपापसातले वाद मिटवावेत

सावंतवाडीच्या विकासासाठी पालकमंत्री आणि आमदार केसरकरांनी आपापसातले वाद मिटवावेत

*कोकण  Express*

*सावंतवाडीच्या विकासासाठी पालकमंत्री आणि आमदार केसरकरांनी आपापसातले वाद मिटवावेत…*

*झोपेच्या गोळ्या घेवून सभागृहात येणार्‍यांनी माझ्यावर टिका करणे चुकीचे…*

*नगराध्यक्ष संजू परब*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दिपक केसरकर यांनी आपपसात सुरू असलेले अंतर्गत वाद मिटवावेत. त्याचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसला आहे. पालकमंत्र्यांनी मला सांगितलेल्या हरिश्चद्रांच्या गोष्टीप्रमाणे आश्वासन पाळून विकास निधी द्यावा, फक्त घोषणा नको, असा सल्ला नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. दरम्यान माझ्यात आणि मुख्याधिकारी यांच्यात सुरू असलेले वाद हे आमच्या प्रॉपर्टीवरुन नाहीत, तर सावंतवाडी शहराचा विकास व्हावा, यासाठी ती चर्चा होेती. त्यामुळे झोपेच्या गोळ्या घेवून सभागृहात येणार्‍यांनी माझ्यावर टिका करणे चुकीचे आहे. त्या जेष्ठ आहेत, त्यामुळे मी आदर ठेवून विरोधात बोलत नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांना लगावला. श्री.परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत घेतली.
यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,राजू बेग,मनोज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले, या ठीकाणी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी पालिकेला दोनदा भेट दिली. याप्रसंगी हरीश्चद्रांची गोष्ट सांगून आपल्याला भरीव निधी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणताही निधी या ठीकाणी दिलेला नाही. आमदार दिपक केसरकर आणि पालकमंत्र्यांचे पटत नाही. त्यामुळे हा विषय झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. असा संशय त्यांनी व्यक्त करुन आता या दोघांनी आपले भांडण मिटवावे आणि शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा,असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, या ठीकाणी आमदार केसरकर यांनी आता पर्यत रोजगाराच्या नुसत्या घोषणाच केल्या.मात्र बारा जणांना सुध्दा रोजगार दिला नाही. सावंतवाडी शहरात सुरू असलेले प्रकल्प आज बंद स्थितीत आहेत. ते सुरू करण्यासाठी त्याचे अमाप भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.
कचर्‍याचा ठेका भरणार्‍या ठेकदाराला धमकी दिल्याच्या आरोपाबाबत विचारले असता असा कोणताही प्रकार झालेला नाही. शिवसेनेेचे नगरसेवक अडाणी आहेत. मात्र त्यांच्या वयाचा मान राखून आम्ही काही बोलत नाही. परंतू या पुढच्या निवडणूकीत केसरकरांनी कीमान पदवीधर झालेला उमेदवार शहरासाठी दयावा, अन्यथा शहराच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!