*कोकण Express*
*बैलगाडी शर्यती, झुंजींना परवानगी द्या!*
*आमदार नितेश राणे यांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोविड १ ९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्वप्रकारच्या सार्वजनिक आणि करमुणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्वप्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. तसेच वरील उल्लेख केलेल्या बैलगाड्या शर्यती आणि बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय तसेच पारंपरिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. तसेच या कार्यक्रमांना बैलांना कोणत्याही प्रकारची इजा आणि दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शैर्यतीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.