*माजी नगराध्यक्ष संतोष नानचे : नेटवर्क अभावी शेतकऱ्यांत संभ्रमावस्था**दोडामार्ग ः प्रतिनिधी*दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवांना गेल्या दोन वर्षांपासून पुरामुळे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप दिलेली नाही, असे असताना शासन आता शेतकरी बांधवांना ई पीक सर्वेक्षण शेती नोंद करण्यास सक्ती करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अगोदर कुठल्या गावात नेटवर्क मिळते याचा पूर्ण अभ्यास करावा, शेतकऱ्यांवर ऑनलाईन ई पीक नोंदणी करिता पहिल्यांदा २४ तास नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कसई दोडामार्ग नगरपंचायत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केली आहे.