*कोकण Express*
*वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळाच्या परवानग्या डोक्यावर टोप घालण्या एवढ्या सोप्या नाहीत*
*पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर असल्याची टीका ; आ. नितेश राणे..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालया बद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी मिळवत असताना व चिपी विमानतळा बद्दल बोलत असताना पालकमंत्री उदय सामंत विसरले असतील की, महाविद्यालय व चिपी विमानतळाच्या परवानग्या डोक्यावर टोप घालण्यासारख्या सोप्या नाहीत. याला केंद्र सरकारची मदत लागते. केंद्र सरकारमध्ये ताकद लागते. वलय लागतं. केंद्रीय मंत्री पदी नारायण राणे हे विराजमान झाल्यानंतर चिपी विमानतळाची परवानगी कशी भेटली? 2014 ते 2019 मध्ये शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत हे कोकणा चे भूमिपुत्र आहेत. ते देखील त्यावेळी केंद्रात मंत्री होते. तेव्हा तर परवानगी का मिळाली नाही. तेव्हा शिवसेना भाजप बरोबर युती मध्ये होती. राणे मंत्री झाल्यावर परवानग्या कशा मिळतात. त्यामुळे याप्रश्नी असं घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा व टोमणे मारण्यापेक्षा केंद्राची मदत घेऊन असे प्रकल्प कसे मार्गी लागतील याबद्दल कोकणातल्या शक्ती कपूर यांनी विचार करावा असा टोला आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.