कणकवली शहरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाशी समीर नलावडे यांचा काय संबंध?

कणकवली शहरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाशी समीर नलावडे यांचा काय संबंध?

*कोकण Express*

*कणकवली शहरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाशी समीर नलावडे यांचा काय संबंध?*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीत जनतेत गैरसमज पसरू नये*

*नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांचा सवाल*

*कणकवली ता.०७-:*

कणकवली शहरात 8 सप्टेंबर रोजी होणारे कोविड लसीकरण हे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानंतर जिल्ह्याला प्राप्त झालेल्या 66 हजार डोस मधून होणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा असा गैरसमज आहे की ही लस जि. प. मध्ये तयार होते. पण मुख्यमंत्री यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांना लस पुरवठा होतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही लस बनवत नाही. त्यामुळे संजना सावंत यांचा या लसीच्या पुरवठ्याचा काही सबंध नाही. त्यामुळेच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीत जनतेत गैरसमज पसरू नये. असे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे कणकवली शहरात 8 सप्टेंबर रोजी लसीकरण होत आहे त्याचे श्रेय नलावडेंनी घेऊ नये. राज्यात सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आहे. राज्य शासना मार्फत पतयेक जिल्हा, तालुका, शहराला लसीचा पुरवठा होतो. आणि जिल्ह्याला लसीचा पुरवठा देखील उद्धव ठाकरेंच्या माध्यमातूनच झाला आहे. येत्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कणकवली सह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना पुरेशी लस उपलब्ध करून देण्यास शिवसेना कटिबद्ध आहे. असे नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!