*कोकण Express*
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून दिले १ लक्ष ४० हजार डोस*
*उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला आले यश*
मुंबई, दि. ७ :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास बाब म्हणून १ लक्ष ४० हजार डोस आज दिले असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
गणेशोत्सव हा कोकणवासीय दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री श्री.सामंत यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री महोदयांनी आज रत्नागिरी साठी ७० हजार तर सिंधुदुर्ग साठी ६९ हजार डोस दिले आहेत.
मुख्यमंत्री महोदयांनी खास बाब म्हणून कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून एक कोकण वासीय म्हणून कोकणातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी भावना व्यक्त केली.
सदर प्राप्त डोस दोन दिवसात नागरिकांना द्यावेत, अशा सूचना श्री.सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत.
ही लस प्राप्त होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रयत्न केले आहेत.