*कोकण Express*
*आयनल गावातील मोबाईल नेटवर्क समस्या सोडवा..*
*आयनल ग्रामस्थांनी घेतली आ.नितेश राणे यांची घेतली भेट; विद्यार्थ्यांसह नागरिकांना होतोय त्रास..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आयनल गावातील व लगतच्या गावातील ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क समस्या भेडसावत आहे.अनेकदा मोबाईल कंपन्यांना कळवूनही दुर्लक्ष केला जात आहे.सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण व नागरिकांना मोबाईल नेटवर्कची गरज आहे.त्यामुळे आयनल गावांमध्ये चांगले मोबाईल नेटवर्क देण्यासाठी आपण त्यांना कडक शब्दांत सूचना करावी,अशी मागणी आयनल ग्रामस्थांनी आ.नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची आयनलच्या ग्रामस्थांनी भेट घेतली.यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सौ. भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच बापू फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेंडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र साटम, माजी सरपंच संतोष वायंगणकर, मोहन लोके, भालचंद्र पडवळ, शैलेश वायंगणकर हे उपस्थित होते.
या निवेदनात मोबाईल नेटवर्क सुविधेमुळे गावातील सर्व ग्रामस्थांना त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे आपण मोबाईल नेटवर्क साठी टॉवरचे काम लवकरात लवकर करुन देवू, असे आश्वासन आ.नितेश राणे यांनी दिले.