*कोकण Express*
*शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही..अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडणारच ; भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आव्हान*
*सचंयनीच्या गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय द्या;छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेत..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सचंयनी सेव्हिंग घोटाळा संसदेत मी उपस्थित केला होता.१५ वर्षे झाली,केस रजिस्टर झाली आहे.त्यांनतर दोन महिन्यांपूर्वी आम.नितेश राणे यांनी पुन्हा लक्ष घालायला सांगितले. या केसची एकदाही सुनावणी झाली नाही.आरोपी मोकाट आहे,त्याला फरार घोषित करा,यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली.याबद्दल दिल्लीत दोन वेळा बैठका झाल्या आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे,डॉ.कराड यांच्यासोबत बैठक झाली.गृहमंत्र्यांनी सचंयनीच्या गुंतवणूकदारांना १०० दिवसांत न्याय द्यावा,यासाठी प्रयत्न करणार आहे.माझे उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे,त्यांनी अनिल परब यांना वाचवून दाखवावे.मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच असे खुले आव्हान भाजप नेते ,माजी खा.किरीट सोमय्या यांनी दिले आहे. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आ.नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत आदी उपस्थित होते. गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांना विनंती करतो,१०० दिवसांत निर्णय लावा.मी आणि आ.नितेश राणे गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.गोरगरीब हजारो लोकांचे सचंयनीमध्ये पैसेही गेले आहेत.जी संपत्ती जप्त झाली आहे,त्यातून छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेत.मोदी सरकारने कायदा केला आहे,त्याचा उपयोग करा,अशी मागणी माजी खा.किरीट सोमय्या यांनी केली. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ एसटी स्टँडमध्ये घोटाळा झाला आहे असे सांगितले.त्याची चौकशी मार्गी लावणार आहोत.अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत.एका रिसॉर्टवर कारवाईचे आदेश झाले आहेत.तर दुसरा रिसॉर्ट तसाच आहे.दापोली मुरुड येथे सीआर झेड भंग केला आहे.त्याला वाचवण्याचा काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने कोस्टल झोन मॅनेजमेंटला पत्र दिले,आणि अनधिकृत रिसॉर्ट आहे असे घोषित केले.असा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले,त्या रिसॉर्टचे मालक अनिल परब अजूनही मंत्री आहेत.हे दुर्दैवी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मंत्रिमंडळात असलेले मंत्री यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत.अनिल परब यांची हकालपट्टी होरणारच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे.अनिल परब यांनी बेनामी प्रॉपर्टी तयार केली आहे.त्याची चौकशी करावी,असे राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी आदेश दिले आहेत.लोकायुक्त यांनी चार्ज घेतला आहे,अनिल परब बाबत सुनावणी झाली आहे.राज्य सरकारने ५ पानी अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप कारवाई नाही,आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा श्री. सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरे सरकारची डर्टी 11 ची नावे जाहीर केली.त्यात जितेंद्र आव्हाड हे बारावे आहेत.शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा ६ सप्टेंबरला राईट हँड असलेल्या सईद खानला हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.इडीला १२ जणांचे पुरावे मी दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहेत.अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.साक्षीदारांना वकील लाच देताना अटक करण्यात आले आहे.अनिल देशमुख यांना फरार घोषित करावे,त्याच्या मुलांवर कारवाई करावी,अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री स्वतःच घोटाळेबाज आहेत.१९ बंगले आहेत,बायकोच्या नावे बंगले बांधकाम करतात व नंतर गायब करतात.ते तर सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत.नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अजून दोन बंगले आहेत, मिलींद नार्वेकर यांचा एक रिसॉर्ट उघड झाला होता.आज पुन्हा दुसरा उघड झाला आहे.अनिल परब यांचा १७ हजार ५०० स्क्वेअर फूट रिसॉर्ट आहे,त्यांनी ४५ हजार प्रॉपर्टी टॅक्स भरला.ठाकरे यांना खुले चॅलेंज करतो,शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही.अनिल परब यांचा रिसॉर्ट पडणारच आहे.माझी लढाई अनिल परब यांच्याविरोधात नाही तर ठाकरे सरकार विरोधात आहे,ही दादागिरी खपवून घेणार नाही,असेही सोमय्या यांनी सांगितले.