बेताल वक्तव्यामुळेच राणेंवर झालेल्या कारवाईनंतर त्यांना यात्रा गुंडाळावी लागली

बेताल वक्तव्यामुळेच राणेंवर झालेल्या कारवाईनंतर त्यांना यात्रा गुंडाळावी लागली

*कोकण  Express*

*बेताल वक्तव्यामुळेच राणेंवर झालेल्या कारवाईनंतर त्यांना यात्रा गुंडाळावी लागली*

*शिवसेना नेते संदेश पारकर यांची टीका*

भाजपाकडून सुपारी घेतल्याप्रमाणे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर नारायण राणे यांनी जणआशीर्वाद यात्रेत टीका करत होते. त्यांच्या या बेताल आणि चुकीच्या वक्तव्यांवर राज्य शासन व महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. म्हणूनच राणेंना हि यात्रा स्थगित करावं लागली. अशी टीका कणकवलीत बोलताना शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले,सिंधुदुर्ग युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश पारकर पुढे म्हणाले कि, बेताल आणि चुकीच्या वक्तव्यामुळे नारायण राणे यांची यात्रा चर्चेमध्ये राहिली. आणि त्याच्यामुळेच राज्य शासन व महाराष्ट्राच्या पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. म्हणूनच राणेंना हि यात्रा स्थगित करावं लागली. यात्रेचा जो मुख्य उद्देश होता तो उद्देश बाजूला सारून या ठिकाणी राणेंनी जसी काय भाजपा कडून सुपारी घेतल्याप्रमाणे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर टीका करायला सुरवात केली. हेच या यात्रेमधील मूळ हेतू हा त्या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे अतिशय योग्य अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.
मी सातत्याने सांगत आलोय कि या जिल्ह्यात राणेंना जनाधार राहिलेला नाही. राणेंचं राजकीय अस्थित्व संपलेलं आहे. तरीसुद्धा ते आपण या कोकणचे या जिल्ह्याचे नेते आहोत अशा प्रकारचा भास दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. मागच्या लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना शिवसेनेने धोबीपछाड दिलेला आहे. विनायक राऊत जवळजवळ पावणेदोन लाख मतांनी निवडून आले. दीपक केसरकर शिवसेनेचे आमदार निवडून आले. वैभव नाईक यांनी राणेंचा मोठा पराभव केला. हे खरतर शिवसेनेचा वैभव आहे, हा इतिहास आहे, वास्तव आहे. असेही पारकर म्हणाले.
पण राणे भाजपला या ठिकाणी जनाधार असल्याचे जे काही भासवलं जात ते खार नाही. येथे खरा जनाधार हा शिवसेनेलाच आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आमचा शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या मेहनतीने यश मिळवेल. आणि राणेंना त्यांची जागा दाखवून देईल. असा इशाराही संदेश पारकर यांनी दिला.
जस भाजपा नथुरामच्या गांधी हत्येच्या कृत्याचे समर्थन करत नाही मात्र नथुरामला पाठिंबा देत त्याच प्रमाणे राणेंच्या वक्तव्याला त्यांचा पाठिंबा नाही मात्र राणेंना पाठिंबा देत आहे. मात्र राणेंची हि भाषा कोकणी जनतेला रुचणारी नाही. एका बाजूला राणेंची यात्रा निघत असताना कणकवली जवळ कलमठ आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील माईन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राणेंना हि मोठी चपराक आहे. असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!